"आपल्या देशात बालविवाहाच्या प्रथेमुळे बालविधवांचे जीवन भकास आणि अर्थहीन होऊ लागले. पुढे महाराष्ट्रात इंग्रजी शिक्षण घेणाऱ्या उदारमतवादी लोकांनी त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले, पण तत्पूर्वी खूप वर्षे आधी हे काम संतांनी केले. समर्थ रामदासांनी सतराव्या शतकात अठरा बालविधवांना उपासना मार्ग दाखवला आणि त्यांचे जीवन अर्थपूर्ण बनवले. त्यांपैकी एक अग्रगण्य नाव म्हणजे आक्कास्वामी. समर्थ रामदास स्वामींच्या निधनानंतर समर्थ संप्रदाय एकसंध बांधून ठेवण्याचे कामी आक्कास्वामी यांनी केले. छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर ताराराणींनी स्वराज्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. या दरम्यान औरंगजेबाने सज्जनगड काबीज केला. त्यावेळी तेथे असलेले श्रीराम पंचायतन आणि समर्थ रामदास स्वामींच्या समाधीला धोका निर्माण झाला होता. अशा प्रसंगी न डगमगता आक्कास्वामी यांनी समर्थांची समाधी भिंत बांधून लपवली आणि राम पंचायतन सोबत घेऊन त्या निबिड अरण्यात जाऊन राहिल्या. अशा खंबीर, दूरदर्शी, उत्तम नियोजन कौशल्य व समर्पित भाव असलेल्या समर्थांच्या ज्येष्ठ शिष्या आक्कास्वामी यांचा जीवनपट सांगणारे हे चरित्र
ThriftBooks sells millions of used books at the lowest everyday prices. We personally assess every book's quality and offer rare, out-of-print treasures. We deliver the joy of reading in recyclable packaging with free standard shipping on US orders over $20. ThriftBooks.com. Read more. Spend less.