स्वातंत्र्यपूर्व काळात सन १९०४च्या कायद्याने सुरू झालेली सहकार चळवळ स्वातंत्र्योत्तरकाळात मोठ्या प्रमाणात रुजली. विशेषत महाराष्ट्रात या चळवळीला मोठा जनाधार आणि राजाश्रय लाभला. या चळवळीतून राजकीय नेतृत्वही उदयास आले, परंतु काळाच्या ओघात चळवळीच्या गुणात्मक विकासाकडे तितक्या गंभीरपणे पाहिले गेले नाही. सहकाराचे राजकीयीकरण चळवळीच्या विकासास बाधकही ठरू लागले. लोकशाही व्यवस्थापन प्रणाली राबवणारी ही चळवळ वर्षानुवर्षे विशिष्ट गट, नेते यांच्याभोवती केंद्रित झाली आणि चळवळीतील सामान्य सभासद सहकारापासून हळूहळू दूर जाऊ लागला. काही संस्था आर्थिक डबघाईस आल्यामुळे सहकारी संस्थांकडे पाहण्याच्या दृष्टीकोनातही बदल घडू लागला. चळवळीस गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी २१व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात गुणात्मक प्रगतीवर लक्ष केंद्रित करण्यात आले. चळवळीत सभासदांचा सक्रिय सहभाग वाढावा म्हणून वैधानिक तरतुदीही करण्यात आल्या, परंतु हा सहभाग वाढविण्यासाठी सहकारातील लोकशाहीचे विकेंद्रीकरण होणेही गरजेचे आहे. सभासदांना त्यांचे हक्क आणि कर्तव्ये यांची जाणीव करून देत सहकार चळवळीची वाटचाल शाश्वत करण
ThriftBooks sells millions of used books at the lowest everyday prices. We personally assess every book's quality and offer rare, out-of-print treasures. We deliver the joy of reading in recyclable packaging with free standard shipping on US orders over $15. ThriftBooks.com. Read more. Spend less.