राजन गवस यांच्या 'ब बळीचा' या कादंबरीत चित्रित झालेले ग्रामजीवन हे महाराष्ट्रातील कोणत्याही खेड्यात थोड्याफार फरकाने आढळते. म्हटलं तर ही कोणा एकाची गोष्ट नाही, आणि म्हटलं तर ती गावातील प्रत्येकाची गोष्ट आहे. म्हणजेच ती गावाची गोष्ट आहे. या अर्थाने समाजाची गोष्ट आहे. काळाच्या बदलत्या रेट्यात ग्रामजीवनाची होणारी घुसमट या कादंबरीत बारकाईने चित्रित झालेली आहे. शेतकरी जीवन हे कृषी संस्कृतीशी संबंधित आहे. तो कृषीउद्योग नाही, ती कृषीसंस्कृती आहे. उद्योग व संस्कृती यातील सीमारेषा कथानकात स्पष्ट होत जाते. सबंध कादंबरीत शेतीनिष्ठ जीवनशैली चित्रित झालेली आहे. आजच्या काळात जे जे म्हणून बरेवाईट या जीवनशैलीत आहे ते जसेच्या तसे उलगडत जाते. शहाण्या माणसाचे डोके भणाणून जावे, त्याची जगण्याची इच्छा उडावी इतके भयंकर हे वास्तव आहे. या वास्तवाला फार समग्रपणे आणि थेटपणे लेखक भिडला आहे. म्हणूनच 'ब बळीचा' या कादंबरीतील समकालीन समाज हा वेगाने घडणाऱ्या मूल्यऱ्हासाचा एकाच वेळी घटक आणि साक्षीदार ठरते. या कादंबरीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिने आविष्काराच्या अंगाने धारण केलेली चेहरेपट्टी, जी एकाच वेळी वाचकाला परि
ThriftBooks sells millions of used books at the lowest everyday prices. We personally assess every book's quality and offer rare, out-of-print treasures. We deliver the joy of reading in recyclable packaging with free standard shipping on US orders over $15. ThriftBooks.com. Read more. Spend less.